शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी - हरिष भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:16 IST

देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव

ठळक मुद्देकोल्हापूर  शिवाजी विद्यापीठातील व्याख्यान

कोल्हापूर : देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी सोमवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र अधिविभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. डॉ. भालेराव म्हणाले, नागरिकांना मुक्त वातावरणात जीवन जगता आले पाहिजे. यासाठी मूलभूत हक्कांची गरज असते. प्रत्येक भारतीयाचे राहणीमान उंचावून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि त्यांच्या मनात उच्चनीचतेची, परस्परांबद्दल श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना निर्माण न होऊ देणे या गोष्टी संविधानाला अभिप्रेत आहेत.

डॉ. शिर्के म्हणाले, संविधान हे केवळ पुस्तक नसून बाबासाहेबांनी या देशाला दिलेला मानवी मूल्यांचा दस्तावेज आहे. यासंदर्भात जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमात संविधान दूतांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, प्रमोद वासंबेकर,के. डी. सोनवणे, आर. जी. सोनकवडे, प्रा. शोभा शेटे, पी. एस. पांडव, आनंद खामकर, सचिन देठे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. वैभव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी आभार मानले.भालेराव म्हणाले* राज्याने कसे वागावे, हे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. ती राज्याची धोरणांबाबतची नैतिकता आहे.* विकास, चौकसबुद्धी, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणारी आपली मार्गदर्शक तत्त्वे आहेत.* धोरणे आखताना या तत्त्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाजी विद्यापीठात सोमवारी संविधानदिनानिमित्त प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांचे व्याख्यान झाले. 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर